ठाकर वस्तीतील महिलांना सन्मान आणि सुरक्षिततेचा आधार – मेघाताई प्रशांतदादा भागवत यांनी दिला शब्द कृतीत उतरवला

नवलाख उंब्रे गावातील ठाकर वस्ती, रामवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सुरू असलेल्या गावभेट दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद वराळे–इंदोरी गटाच्या इच्छुक उमेदवार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्यासमोर वस्तीतील महिला भगिनींनी एक जिव्हाळ्याची आणि गंभीर समस्या मांडली. वस्तीमध्ये शौचालय नसल्याने तसेच काही शौचालये बंद पडल्याने महिलांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली आणि “आमच्या वस्तीत शौचालय बांधून द्या” अशी थेट मागणी केली.

या मागणीची गंभीरता ओळखून मेघाताईंनी कोणतीही टाळाटाळ न करता तात्काळ प्रशांतदादा भागवत यांच्याशी चर्चा केली आणि दुसऱ्याच दिवसापासून प्रत्यक्ष शौचालय उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

ठाकर वस्तीतील नागरिक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असून, पडक्या घरांमध्ये राहत शेळ्या–मेंढ्यांवर उपजीविका करणारा हा समाज आहे. या दुर्लक्षित घटकांच्या मूलभूत गरजांची जाणीव ठेवत मेघाताई व प्रशांतदादा भागवत यांच्या पुढाकारातून वस्तीमध्ये अत्यंत दर्जेदार, स्वच्छ व मजबूत शौचालये मोफत उभारण्यात आली.

शौचालयांचे काम पूर्ण होताच वस्तीतील महिलांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता व सन्मानाशी निगडित असलेली ही मोठी समस्या सोडवल्यामुळे मेघाताईंच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या वेळी नवनाथ पडवळ, तानाजी पडवळ, अंतुभाऊ शेटे, नवनाथ सांवत, मच्छिंद्र शेटे, बाळासाहेब पारधी, संजय जगनाडे, मोहिनी ताई कलावडे, शोभा ताई शिर्के, स्वाती ताई पापल, पूनम ताई पडवळ, सुमन ताई शिर्के, आनंदीबाई वाळुंज, शिल्पा ताई विक्रम कदम, पूनम तानाजी पडवळ, कल्पना जाधव, अल्काबाई कार्ले, शुभांगी कदम, सुरेखा जाधव, मनीषा खंडागळे, सविता मेंगळे, कल्पना मेंगळे, बाबाबाई जाधव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेघाताई प्रशांतदादा भागवत या जिल्हा परिषद वराळे–इंदोरी गटातून इच्छुक उमेदवार असून, कोणतेही अधिकृत पद नसतानाही त्या सातत्याने नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. दिलेला शब्द कृतीतून पूर्ण करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण तालुक्यात निर्माण झाली आहे. महिलांशी व ज्येष्ठ नागरिकांशी असलेला थेट संवाद, तळागाळातील प्रश्नांची जाण आणि तत्काळ निर्णयक्षम कार्यशैली यामुळेच त्या या गटातील प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.
ठाकर वस्तीतील शौचालय उभारणीसारखी महत्त्वाची समस्या सोडवल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी या गटात मेघाताई भागवत यांची निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें